Khandesh Darpan 24x7

जळगाव मधील ७० हजारांवर शेतकरी पीक नुकसान मदतीपासून वंचित…!

जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीसह पुरामुळे केळीसह कपाशी, मका, सोयाबीन, भाजीपाला पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप न झाल्याने सरकारवर टीका केली जात होती.



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -

जिल्ह्यात सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीने सुमारे २ लाख ४७ हजार २६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन ३ लाख २५ हजार ३९ शेतकरी बाधित झाले. संबंधितांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने ३०० कोटी रूपयांचे अनुदान मंजूर केल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात दिवाळी उलटूनही ७० हजारांवर शेतकऱ्यांना कोणतीच आर्थिक मदत मिळू शकलेली नाही.


जळगावमधील ७० हजारांवर शेतकरी पीक नुकसान मदतीपासून वंचित (प्रातिनिधिक छायाचित्र)


जाहिरात :  राधाकृष्ण संकुल, रावेर रोड सावदा (https://youtu.be/Ngpky2CVTWM)  - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा. 



जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीसह पुरामुळे केळीसह कपाशी, मका, सोयाबीन, भाजीपाला पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप न झाल्याने सरकारवर टीका केली जात होती. प्रत्यक्षात, जिल्ह्यासाठी दिवाळीच्या दोन दिवस आधी सुमारे २९९ कोटी ९४ लाख ४६ हजार रूपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली. त्याचे वितरण दिवाळीच्या सुट्टीतही तहसील कार्यालयांकडून केले जाणार असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात, ई केवायसीच्या नावाखाली शुक्रवार अखेर १ लाख ६९ हजार ५४३ शेतकऱ्यांनाच १४७ कोटी ७२ लाख ९६ हजारांचे अनुदान वितरीत झाले आहे. ई केवायसी न झालेल्या सुमारे ७० हजार ७९३ शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे ६० कोटी ८० लाख ८७ हजार रूपयांचे पीक नुकसान अनुदान मिळालेले नाही.



जाहिरात :  साई डेअरी आणि कोल्ड्रिंक्स (https://youtu.be/EWXxirDpWgQ)   - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा. 


प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबरच्या कालावधीत एकूण सुमारे २ लाख ८३ हजार ३२९ हेक्टरवरील पिकांचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान होऊन ३ लाख ८२ हजार ४२५ शेतकरी बाधित झाले आहेत. संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार, आतापर्यंत सुमारे ३५२ कोटी ७१ लाख ४० हजार रूपयांची मदत मंजूर झाली आहे. प्रत्यक्षात, आजतागायत १ लाख ८८ हजार ६७२ शेतकऱ्यांना १६२ कोटी ३७ लाख ७३ हजार रूपयांची मदत वितरीत झाली आहे. ई केवायसी न झालेल्या ९० हजार ४३८ शेतकऱ्यांना कोणतीच मदत अजुनही मिळालेली नाही.



जाहिरात :  प्रियंका इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर, दुर्गामाता चौक, सावदा (https://youtu.be/Vx4iGbBdZ2s)   - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा. 


ई केवायसी करण्याचे आवाहन


जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असून, तालुकास्तरावरुन त्याचे वाटप केले जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार ई केवायसी पोर्टल देखील ५ नोव्हेंबर पासून कार्यान्वित झाले आहे. ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेली नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.

सावद्यातील  स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे  : राधाकृष्ण संकुल  
संपर्क : विलास यशवंतराव पाटील ७५८८८१५१६६ , सागर विलास पाटील ८३२९८३९१७८    



  


सहप्रायोजक आहे.  

  

सौजन्य : लोकसत्ता 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.






Post a Comment

أحدث أقدم