Khandesh Darpan 24x7

कोकणातील लहान गावातली सरकारी शाळा थेट देशात अव्वल ! पीएमश्री योजनेत वाकवली शाळेचा ऐतिहासिक पराक्रम



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -  

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वाकवली नं. 1 जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेची केंद्र सरकारच्या 'पीएम श्री शाळा' योजनेत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये निवड झाली आहे. ब्रिटिशकालीन इतिहास असलेली ही शाळा आधुनिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक सुविधांमुळे शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. लवकरच नवी दिल्लीत या शाळेला केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते 'पीएम श्री' म्हणून गौरविण्यात येणार आहे.



रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वाकवली गावातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा (वाकवली नं. 1) हिला केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेअंतर्गत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये स्थान मिळालं आहे. पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी ही शाळा 1896 साली स्थापन झाली असून, ब्रिटिशकालीन इतिहास लाभलेली आहे.


शाळेने आधुनिक तंत्रज्ञानासह विविध भौतिक व शैक्षणिक सुविधा उभारून शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. डिजिटल क्लासरूम, सीसीटीव्ही, इंटरनेट, आधुनिक ग्रंथालय, सोलर पॅनल, सेल्फी पॉईंट, योगा शिबिर, आर्थिक साक्षरता उपक्रम आणि आरोग्य शिबिरे यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी इथे करण्यात आली आहे.



देशपातळीवर झाला सन्मान -

२९ जुलै २०२५ रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित समारंभात केंद्रीय शिक्षण मंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या शाळेला ‘पीएम श्री’ शाळा म्हणून राष्ट्राला समर्पित करण्यात आला. या यशाची अधिकृत माहिती राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून प्राप्त झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारंभाला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, जयंत चौधरी (शिक्षण व कौशल्य विकास मंत्री), खासदार पियुष गोयल व आमदार योगेश सागर यांची उपस्थिती होती.



राज्यातून अंतिम फेरीत वाकवलीचा यशस्वी प्रवेश -

रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण १६ शाळांची निवड झाली होती. त्यामधून लांजा, झरेवाडी आणि वाकवली या तीन प्राथमिक शाळांचा राज्यस्तरावर विचार करण्यात आला. केंद्राच्या अंतिम फेरीत वाकवली शाळेने प्रश्नावली व नवोपक्रमांमधून सर्वोत्तम ठरून राष्ट्रीय मानांकन प्राप्त केलं आहे.






कधी काळी 'सुतार शाळा' म्हणून ओळखली जाणारी ही शाळा आज डिजिटल शिक्षणाच्या युगातही स्वतःचं स्थान टिकवून आहे. विद्यार्थ्यांमध्ये कार्यकुशलता, इतिहास व वारसा यांची ओळख आणि जीवन कौशल्यावर आधारित शिक्षण यासाठीही शाळा ओळखली जाते.



ग्रामस्थांचा अभिमान, शिक्षकांचा परिश्रम -

या यशामध्ये मुख्याध्यापक जावेद शेख, शिक्षिका निवेदिता सागर आणि ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. शालेय समितीचे अध्यक्ष दुर्गेश जाधव म्हणाले, “गावात प्राथमिक शिक्षणालाच आम्ही प्राधान्य देतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचं उद्दिष्ट आहे.” या यशाबद्दल गृहराज्यमंत्री व आमदार योगेश कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, गटशिक्षणाधिकारी श्री. सांगडे आणि अनेक मान्यवरांनी शाळेच्या टीमचे अभिनंदन केले आहे.



39 निकषांवर मूल्यांकन, ग्रामीण भागातून देशात सर्वोत्तम!

या शाळेची निवड एकूण 39 मूल्यांकन निकषांवर करण्यात आली. कोकणातील ग्रामीण भागातून उत्तुंग यश मिळवणारी ही शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 सौजन्य : महाराष्ट्र टाईम्स 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.






Post a Comment

أحدث أقدم